ठाणे : भारतीय जनता पक्ष व दयाल फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ठाणे येथील चौहान चाळ, नलपाडा, तुलसी धाम रोड येथे झाडे लावण्यात आली. कार्यक्रमाला नगरसेविका स्नेहा आंब्रे, शिवसंग्राम संघटनेचे ठाणे जिल्हाप्रमुख रमेश आंब्रे, दयाल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष जयस्वाल, राकेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.